पश्चिम महाराष्ट्र

सैनिक टाकळीच्या चार पिढ्यांची जाज्वल्य देशसेवा 

गणेश शिंदे

जयसिंगपूर - देशभक्तीतून देशसेवेची परंपरा जपलेल्या सैनिक टाकळी (ता. शिरोळ) गावच्या शूरवीरांनी पहिल्या महायुद्धापासून ते अलिकडच्या कारगील युद्धापर्यंत प्राणाची बाजी लावली आहे. चार-चार पिढ्यांनी देशरक्षणासाठी बलिदान दिलेल्या या गावचे नावही सैनिकांची टाकळी म्हणजेच "सैनिक टाकळी' असे आदराने घेतले जाते. संपूर्ण देशासाठी अभिमान असणाऱ्या या गावची सैनिकी परंपरा म्हणजे जाज्वल्य देशप्रेमाचे प्रतिक म्हणावे लागेल. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कृष्णाकाठी वसलेल्या सैनिक टाकळी गावाने देशसेवेतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावातील अनेक तरुण सैन्यात भरती होऊन देशाचे आणि गावाचे नाव लौकीक करताना दिसत आहे. अगदी ब्रिटीश काळापासून येथील तरुणांनी लष्कराची वाट मळली आहे. 1880 पासून लष्करात जाण्याची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरुच आहे. 1911 पासून येथील तरुणांनी देशसेवेचे ब्रीद जपले आहे. 1914 ते 1919 या पहिल्या जागतिक महायुध्दाच्या काळात सुरू झालेली सैन्यभरतीचे व्रत इथल्या तरुणांनी आजही जपले आहे. 

पहिल्या महायुद्धाच्या काळात एकाचवेळी 60 तरुण सैन्यात भरती झाले. त्यासाठी तत्कालीन सरकारने जमिनीही दिल्या. आजही या जमिनी "लष्करी पट्टा' म्हणून ओळखल्या जातात. 1914 ते 1919 झालेल्या युद्धात मित्र राष्ट्रातील अनेक जवानांचे बळी गेले. यात टाकळीचे सहा जवान शहीद झाले.

गावातील प्रत्येकाच्या मनात देशप्रेम ठासून भरले आहे. देशभर गावचा लौकीक निर्माण झाला आहे. अनेकांनी रक्त सांडून हा लौकीक निर्माण केला आहे. देशसेवेची परंपरा यापुढे अशीच सुरु राहील. आमची तिसरी पिढी देशसेवा करत आहे. 
- शामराव पाटील,
निवृत्त, ऑनररी लेफ्टनंट 

युद्धसमाप्तीनंतर काही जवान सहा वर्षे पायपीट करत गावत परतले. सहा वर्षात त्यांचा शोध लागला नसल्याने कुटुंबियांनी त्यांचे पिंडदानही केले. मात्र, काही जिगरबाज महिलांनी आपल्या पतीचा मृतदेह पाहिल्याशिवाय कुंकू पुसणार नाही, अशी शपथ घेऊन ती पाळली. 

दुसऱ्या महायुद्धात लढताना हवालदार तुकाराम पाटील यांचे शीर धडावेगळे केले. शत्रूच्या काळजात धडकी भरवणारा पराक्रम त्यांनी केला. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन ब्रिटीश सरकारने त्यांना मरणोतर पुरस्कार देऊन गौरविले. त्यांच्या आईला त्याकाळी रोख सात हजाराची पेन्शन सुरू केली. हजार-दीड हजार कुटुंबे असलेल्या या गावाने दीड हजाराहून अधिक सैनिक दिले. पहिले आणि दुसरे महायुद्ध, स्वातंत्र्योतर काळात चीन, पाकिस्तानविरोधात झालेली युद्धे आणि श्रीलंकेत पाठवलेल्या शांतीसेनेतून एलटीटीईशी झालेल्या संघर्षात टाकळीच्या 18 जवानांनी हौतात्म्य पत्करले आहे. सैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून त्यांचे प्रेरणादायी स्मारक उभारले गेले. 

गावच्या सैनिकी परंपरेवर दृष्टिक्षेप 

  • आजतागायत सेवा बजावलेले जवान..... 1004 

  • शहीद जवान.......................................18 

  • स्वातंत्र्य सैनिक ...................................6 

  • लष्कर ...............................................17 

  • नौदल ................................................17 

  • हवाईदल ..........................................7 

  • पोलिस ..............................................801 

  • देशसेवेतील निवृत्त..............................208 

  • वीर माता ............................................2 

  • वीर पत्नी .............................................4 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT