पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील नामवंत कंपन्यांचे उत्पादन सुरू; कामगारांची कशी दक्षता घेताहेत पाहा... 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील टाटा मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्रा यासारख्या मोठ्या नामवंत कंपन्यांसहीत अनेक लहान-मोठे उद्योगधंदे चालू झाले आहेत. त्यामुळे अर्थचक्राची बंद पडलेली चाकेही फिरण्यास सुरुवात झाली आहे. उद्योग पूर्ववत सुरू झाल्याने कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 12 हजार सुक्ष्म, मध्यम उद्योगधंदे असून त्यापैकी जवळपास 10 हजार लहान-मोठे उद्योग सुरू झाले आहेत. टाळेबंदी लागू झाल्यापासून सुमारे दोन महिने हे उद्योगधंदे बंद होते. मात्र, उद्योजकांच्या मागणीनुसार, काही अटी-शर्तींवर 14 मेपासून हे उद्योग सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. सरकारने पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळले आहे. त्यामुळे उद्योगधंदे सुरू झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स कंपनीच्या बहुतेक विभागाचे सकाळी 8.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वसाधारण (जनरल) पाळीत काम चालू झाले आहे. कामावर जेमतेम 25 ते 30 टक्के कामगार येत असून, काम करताना सुरक्षित अंतर पाळले जात आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासह ईआरसी, के ब्लॉक प्रवेशद्वारावर चारचाकी आणि सायकलींसाठी सॅनिटायझर टनेल उभारण्यात आले असून, कामावर येताना अधिकारी-कामगार वर्गाला त्याचा वापर करावा लागत आहे. कंपनीत दुचाकी वाहनांना परवानगी नाकारण्यात आली आहे. कामगारांना आत सोडताना त्यांना ताप आहे अथवा नाही, हे तपासून घेतले जात आहे. आरोग्य सेतू ऍप आणि मास्क वापरणे हे बंधनकारक करण्यात आले असून, प्रतिबंधित क्षेत्रातील कामगारांना व्यवस्थापनाने कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सर्दी-खोकला असल्यास कामावर येऊ नये, गावी गेलेल्या कामगारांनी 14 दिवस होम क्वारंटाइन झाल्याशिवाय कामावर येऊ नये, अशा सूचनाही व्यवस्थापनाने दिल्या आहेत. कंपनीच्या कॅन्टिनमध्ये नेहमीप्रमाणे, कामगारांसाठी चहा, न्याहरी आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. मात्र, पूर्वी एका टेबलावर 6 कामगार बसत असत. त्याऐवजी केवळ 2 कामगारांनाच मुभा देण्यात आली आहे. सेल्फ सर्व्हिस बंद करून कॅन्टिनचे कुक कामगारांना सेवा देत आहेत. मात्र, कॅन्टिनमधील जेवण घेणाऱ्या कामगारांची संख्या कमी झाली असून अनेक कामगार घरचा डबा घेऊन येत आहेत.

कामगारांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग... 

दिवसभरात एखाद्या विभागातील कामगार दुसऱ्या विभागात कामानिमित्त गेल्यावर तो कोणाकोणाला भेटला? याची नोंद करावी लागत आहे. याशिवाय, कामगारांच्या कुटुंबात कोणी आजारी आहे किंवा नाही याची माहितीही ठराविक दिवसांनी घेतली जात आहे. कंपनी बसमध्ये बसण्यापूर्वी आणि उतरल्यावर बस पूर्णपणे निर्जुंतूक केली जात आहे. बसचालकांची वैद्यकीय तपासणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT