पुणे

शेतकऱ्यांना २४ तास वीज कधी मिळणार - श्रीरंग बारणे

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - देशातील शहरी भागामध्ये २४ तास वीजपुरवठा उपलब्ध असतो; परंतु ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागतो आणि रात्र रात्र जागून शेतीला पाणी द्यावे लागते. ही देशभरातील शेतकऱ्यांची व्यथा खासदार श्रीरंग बारणे यांनी तारांकित प्रश्‍नाद्वारे लोकसभेत मांडली. 

खासदार बारणे म्हणाले, की सध्याचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोळशापासून व अन्य वीजनिर्मितीच्या मार्गाने देशातील विजेचे उत्पन्न वाढल्याचे एकंदर अहवालावरून तरी दिसते. राज्यातील वीजवाटप हा जरी राज्य सरकारच्या अखत्यारीतला प्रश्‍न असला, तरी देखील शेतकऱ्यांना २४ तास वीज कधी मिळणार, असा तारांकित प्रश्न बारणे यांनी विचारला. 

केंद्रीय कोळसा खाण व ऊर्जा मंत्री पियुष गोयल म्हणाले, विजेचे उत्पन्न मागील सरकारच्या तुलनेने वाढले आहे. देशभरातील शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील विजेवरील पूर्ण नियंत्रण हे जरी राज्य सरकारचे असले तरीदेखील केंद्राच्या माध्यमातून तशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील असे या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाल्याचे बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT