उत्तर महाराष्ट्र

वाढत्या तापमानामुळे करपल्या केळीबागा 

संतोष पाटील

भोकर (ता. जळगाव), ता. 26 ः मार्च, एप्रिलमध्ये लागवड केलेल्या तापी नदीपट्ट्यातील केळीबागांना पाणीटंचाई जाणवत असून, निसवण झाडे व चालू स्थितीत असलेली लहान झाडे करपली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने शेतकऱ्यांना भरपाईचा दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 
जिल्ह्यात सध्या तापमान खूप वाढले आहे. तब्बल 44 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले. याशिवाय गिरणा परिसरपाठोपाठ तापी परिसरातील कूपनलिकांनी तळ गाठला आहे. जळगाव तालुक्‍यातील कंरज, सावखेडा, किनोद, कठोरा, भादली, गाढोदा, नंदगाव, फेसर्डी, पळसोद, जामोद, आमोदा, गोरगावले, खेडीभोकर कोळंबा, संपुले या परिसरातील केळीबागा वाढत्या तापमानामुळे करपल्या आहेत. 
तापमान वाढल्यामुळे केळीचे घड पक्व होण्याअगोदरच अतिउष्णतेमुळे निसटून किंवा अर्धवट मोडून पडत आहेत. कूपनलिकांनी तळ गाठल्यामुळे केळी पिकासाठी लागलेला खर्च निघणे जिकिरीचे बनले आहे. यासंदर्भात सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई कृषी विभागाने करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

कपाशी लागवडीलाही फटका 
मे व जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड चांगल्या प्रमाणात करण्यात येत होती. पंरतु यावर्षी अजूनही उन्हाची तीव्रता कमी न झाल्याने व पाणीटंचाई असल्याने कमी प्रमाणात कपाशी लागवड केली जात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT