सर्वांना नळाद्वारे पाणी देण्यास सरकार कटिबद्ध

सर्वांना नळाद्वारे पाणी  देण्यास सरकार कटिबद्ध

मुंबई: पाणी हा देशात राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे. जलसंधारण आणि जलसाठे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या आहेत. 2024 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली. मुंबईत 15 व्या जागतिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. 

"स्वच्छ भारत अभियाना'प्रमाणे पाणी वाचवण्यासाठी "जलजीवन अभियान' ही चळवळ बनेल, असे शेखावत यांनी सांगितले. जलजीवन अभियानासाठी साडेतीन लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उद्योगांसाठी केला जाणारा पाण्याचा वापर आणि उद्योगाकडून प्रक्रिया न केलेले पाणी नदीत सोडले जाणे यासंदर्भात व्यापक धोरण ठरवण्यासाठी उद्योग क्षेत्रासमवेत सरकार चर्चा करण्यात तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

जल संधारणाचे महत्त्व पटावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अडीच लाख सरपंचांना 11 विविध भाषांमध्ये पत्रे लिहिली आहेत. गावातील मृत जलसाठे पुनरुज्जीवीत करणे, पाण्याचा काटेकोर वापर, जल प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे शेखावत यांनी सांगितले. नदी जोड प्रकल्पांमुळे राज्यांमधील पाण्याच्या वाटपाचे वाद मिटतील. दुष्काळी भागात नदीजोड प्रकल्पामुळे पाणी उपलब्ध होईल, असा विश्‍वास शेखावत यांनी व्यक्त केला. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com