‘एनआरआय’ही घेऊ शकतात एअर इंडिया

air-india
air-india

नवी दिल्ली - केंद्र सरकारने एअर इंडियाचे १०० टक्के संपादन करण्यास अनिवासी भारतीयांना (एनआरआय) परवानगी दिली आहे. एअर इंडियाचे १०० टक्के खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, त्यासाठी सरकारकडून बोली प्रस्तावही मागवण्यात आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने एअर इंडियाचा १०० टक्के हिस्सा विकत घेण्यास अनिवासी भारतीयांना परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. यामुळे आता अनिवासी भारतीयांना एअर इंडियामध्ये १०० टक्के गुंतवणूक करता येणार आहे. 

सरकारच्या नव्या निर्णयामुळे ‘सबस्टॅन्शियल ओनरशिप अँड इफेक्‍टिव्ह कंट्रोल’च्या (एसओईसी) आराखड्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. जगभरातील विमानसेवा क्षेत्रात या नियमांची अंमलबजावणी केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com