चुकवू नये अशी संधी...खास तुमच्यासाठी! 

hitesh-mali
hitesh-mali

म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला  असून, चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये तब्बल ३५ हजार २६० कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक केली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात पैशाचा ओघ आल्याने इक्विटी म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेतदेखील (एयूएम) वाढ झाली आहे.  

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया’ने (ॲम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २० टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. देशातील ४२ म्युच्युअल फंड कंपन्यांकडील एकत्रित ‘एयूएम’ मार्चमधील २१.३६ लाख कोटी रुपयांवरून आता जूनमध्ये २३.४३ लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ४२ म्युच्युअल फंड हाऊसपैकी ३३ म्युच्युअल फंड हाऊसच्या व्यवसायात या काळात वृद्धी झाली आहे.

गुंतवणुकीचा कल बदलतोय
‘ॲम्फी’ने नुकतीच जाहीर केलेली ही आकडेवारी खूपच बोलकी आहे. याचे कारण म्हणजे पारंपरिक गुंतवणूक प्रकारांकडून काहीशा नव्या गुंतवणूक प्रकाराकडे नागरिकांचा कल वाढत चालल्याचे स्पष्ट चित्र यानिमित्ताने दिसू लागले आहे. मुदत ठेवींसारखा निश्‍चित उत्पन्नाचा पर्याय, सोने-चांदी, रिअल इस्टेट आणि इक्विटी (शेअर किंवा म्युच्युअल फंड) या प्रमुख चार गुंतवणूक प्रकारात साधारणपणे गुंतवणूक केली जाते. पण गेल्या काही वर्षांत या चारही प्रकारांतील गुंतवणुकीच्या परताव्याची तुलना केली तर साहजिकच इक्विटी या प्रकाराने इतरांपेक्षा अधिक परतावा दिल्याचे दिसून येते. आपल्या देशात बॅंक किंवा पोस्टातील ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात असली तरी त्यातून मिळणारा परतावा हा महागाईदरापेक्षा कमीच राहताना दिसतो. त्यामुळे महागाईदरावर मात करून ‘खऱ्या अर्थाने परतावा’ मिळवायचा असेल तर इक्विटी या ॲसेट क्‍लासची कास धरणे गरजेचे ठरत आहे आणि याची जाणीव हळूहळू गुंतवणूकदारांना होऊ लागली आहे. त्याचेच प्रतिबिंब म्युच्युअल फंडांकडे वाढत चाललेल्या गुंतवणुकीच्या आकड्यांतून दिसून येते. 

‘सकाळ मनी’चा प्रभावी उपक्रम
बदलत्या काळाची गरज नेमकी ओळखून, सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आर्थिक समृद्धीसाठी एक चांगला गुंतवणूक प्रकार प्रभावीपणे सादर करण्याचे ‘सकाळ मनी’ने ठरविले आहे. याचे पहिले पाऊल म्हणून (www.sakalmoney.com) या नव्या वेबसाईटच्या माध्यमातून प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठी; तसेच इंग्रजी अशा दोन भाषांत कार्यरत असलेल्या या वेबसाईटचा लाभ समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना घेता येत आहे. म्युच्युअल फंडासह पर्सनल फायनान्स क्षेत्रातील ताज्या घटना-घडामोडींच्या बातम्या आणि तज्ज्ञांचे लेखही या ठिकाणी वाचायला मिळत आहेत. त्यालाच पूरक अशा ‘धन की बात’ या पानाच्या माध्यमातून या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर लेखही वाचकांसमोर मांडले जात आहेत. ‘सकाळ मनी’च्या या उपक्रमाची चर्चा आता राज्यभर सुरू झाली असून, त्याला वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स-आयएफए) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक भरभराटीची संधी उपलब्ध झाल्याने अनेक जण या उपक्रमात सहभागी होत आहेत.

आता थेट नागरिकांशी संवाद
या उपक्रमाचे पुढील पाऊल म्हणून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात थेट नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ‘सकाळ मनी’ने जनजागृतीपर सेमिनार घेण्यास सुरवात केली आहे. ‘सकाळ मनी’ आणि ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’ यांच्या वतीने ‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ या सेमिनारचे नुकतेच चिंचवडमध्ये आयोजन करण्यात आले होते. सर्व वयोगटांतील नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या प्रकारची ‘चुकवू नये अशी संधी’ आता तमाम पुणेकरांना मिळणार आहे. 

हितेश माळी यांचे मार्गदर्शन
‘पारंपरिक कमी परतावा देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक विरुद्ध अधिक चांगला परतावा देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक’ या विषयावरील हा खास कार्यक्रम येत्या शनिवारी (१४ जुलै) गणेश कला-क्रीडा मंच (नेहरू स्टेडियमजवळ, स्वारगेट) येथे आयोजित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध भांडवली बाजार विश्‍लेषक, म्युच्युअल फंड क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ, प्रभावी वक्ते अशी ओळख असलेले हितेश माळी या वेळी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. श्री. माळी यांना भांडवली बाजाराचा तब्बल २२ वर्षांचा व्यापक अनुभव आहे. इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, रिसर्च ॲनालिस्ट, इक्विटी डेरिव्हेटिव्हज, डिपॉझिटरी ऑपरेशन्स, सिक्‍युरिटीज ऑपरेशन्स अँड रिस्क मॅनेजमेंट अशी सर्व प्रकारची प्रमाणपत्रे प्राप्त केलेल्या माळी यांनी आतापर्यंत एक हजाराहून अधिक सेमिनारच्या माध्यमातून १२ हजारांहून अधिक म्युच्युअल फंड एजंट, ५० हजारांहून अधिक सब-ब्रोकर आणि दीड लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करून सक्षम केले आहे. भांडवली बाजाराचे विश्‍लेषण करताना ते या क्षेत्रातील ताज्या घटना-घडामोडींचे संदर्भ देत गुंतवणूकदारांना प्रभावीपणे मार्गदर्शन करतात. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना समजेल अशी परिणामकारक भाषाशैली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अशा प्रख्यात व मान्यवर व्यक्तीचे मार्गदर्शन मिळण्याची संधी ‘चुकवू नये’ अशीच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

प्रवेशासाठी नावनोंदणी आवश्‍यक
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, त्याला उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्यांना ७४४७४-५०१२३ या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना नावनोंदणी झाल्याचा ‘एसएमएस’ पाठविला जाणार आहे. ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ सर्वसामान्य नागरिकांबरोबरच इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्सनी (आयएफए) घ्यावा आणि त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com