मारुतीकडून तब्बल 3000 कर्मचाऱ्यांची कपात

मारुतीकडून तब्बल 3000 कर्मचाऱ्यांची कपात

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने 3000 हंगामी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रात सुरू असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर मारुतीने ही नोकरकपात केली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

कंपनीतून काढण्यात आलेले कामगार कंत्राटी स्वरुपात काम करत होते. मंदीमुळे उत्पादन घटलेले असल्यामुळे मारुतीने त्या कामगारांच्या कंत्राटांचे नूतनीकरण केलेले नाही. मात्र, कायमस्वरुपी कामगारांवर कोणतेही संकट आलेले नाही. 'हा उद्योग व्यवसायाचा एक भागच आहे. जेव्हा मागणी वाढते तेव्हा अधिकाधिक कामगारांची भरती केली जाते आणि जेव्हा मागणी कमी असते तेव्हा कामगारांच्या संख्येत कपात केली जाते', असे मत मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी व्यक्त केले आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेतील विक्री, विपणन, सेवा, विमा, फायनान्स, सुटे भाग, वाहनचालक, पेट्रोल पम्प, दळणवळण यासारख्या घटकांमध्ये नोकऱ्यांची निर्मिती होत असते. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा परिणाम दिसतो. त्यापेक्षा अधिक मोठा असल्याचेही पुढे भार्गव म्हणाले.

सध्या ऑटोमोबाईलमधील उत्पादनाने नीच्चांक गाठलेला असून, हे क्षेत्र रुळावर येण्यासाठी तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीपर्यत वाट पाहावी लागेल. पुढील आर्थिक वर्षात हे क्षेत्र जोमाने उभे राहिल अशी आशा करू या. जर सरकारने काही अनुकूल निर्णय घेतले तर त्यामुळे परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जीएसटी करात सरकारने कपात करावी, असेही भार्गव यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com