PNB : पीएनबी बँकेच्या ग्राहकांना मिळणार ५० हजार रुपयांचा लाभ

शेतकऱ्याकडे मागील दोन वर्षांचे बँकेचे रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.
PNB
PNBgoogle

मुंबई : देशातील सरकारी आणि निमसरकारी संस्था शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत, ज्याचा तुम्ही मोठा फायदा घेऊ शकता. पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आता देशभरात अशा अनेक योजना सुरू आहेत, ज्यामुळे शेतकरी श्रीमंत होताना दिसत आहेत. तुम्ही या योजनांचा सहज लाभ घेऊ शकता.

आजकाल बँक शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत कर्जाच्या स्वरूपात लाभ देत आहे. पीएनबी किसान तत्काळ कर्ज योजनेद्वारे हे मोठे कर्ज देत आहे. कर्ज घेण्यासाठी बँकेने काही अटी ठेवल्या आहेत, ज्यांचे पालन करावे लागेल. एवढेच नाही तर काही कागदपत्रेही मागितली आहेत.

कर्जासाठी आवश्यक अटी जाणून घ्या

शेतजमिनीचे शेतकरी किंवा भाडेकरू असणे फार महत्वाचे आहे.

शेतकरी किंवा शेतकरी गट, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड (KCC) आहे, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

शेतकऱ्याकडे मागील दोन वर्षांचे बँकेचे रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

कोणतेही सेवा शुल्क भरावे लागणार नाही, शेतकऱ्यांना हे कर्ज घेण्यासाठी काहीही तारण ठेवण्याची गरज नाही.

तसेच कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारले जाणार नाही.

त्याची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना ५ वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जाईल.

तुम्हालाही या कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही PNB बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता.

पंजाब नॅशनल बँक (PNB) प्रमाणे आता अनेक संस्था सामान्य लोक आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. तुम्हीही घरबसल्या नवीन योजनांचा लाभ घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com