‘निफ्टी’ झेपावणार का?

nifty
nifty

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’मध्ये ११,१०० ते १२,३०० अंशांपर्यंत सलग वाढ झाली आहे. नऊ सप्टेंबरपासून आजपर्यंत ही १२०० अंशांची वाढ झाली असल्याने नफावसुलीमुळे बाजारात वाढीची गती थोडी मंदावेल. १२०० अंशांच्या वाढीनंतर ६०० अंशांचे ‘करेक्‍शन’ होणे गरजेचे आहे; पण ते अर्थसंकल्पाअगोदर होण्याची शक्‍यता दिसत नाही. अर्थसंकल्पापर्यंत ‘निफ्टी’ १२,५०० अंशांपर्यंत वाढण्याची शक्‍यता असून, त्यानंतरच मोठे ‘करेक्‍शन’ होण्याची शक्‍यता आहे. अर्थसंकल्पातून बाजाराला मोठ्या अपेक्षा आहेत व त्या पूर्ण होण्याची शक्‍यता गृहीत धरून शेअर बाजार त्या अर्थसंकल्पाला ‘डिस्काउंट’ करीत आहे. परकी वित्तीय संस्था मागील तीन महिन्यांपासून सतत खरेदी करीत असून, आतापर्यंत त्यांनी २२,६८२ कोटींची खरेदी केली आहे. त्यासमोर देशी संस्था नफावसुली करीत असून, त्यांनी २७२२ कोटींची विक्री केली आहे. नाताळची सुटी संपल्यावर पुढील महिन्यात पुन्हा खरेदीचा जोर वाढेल व त्या जोरावर ‘निफ्टी’ १२,५०० अंशांचे उद्दिष्ट गाठू शकेल. जागतिक पातळीवरून बाजारावर दबाव नाही; परंतु सध्या बाजाराच्या वाढीत भर टाकणारे मुद्देही नाहीत. त्यामुळे पुढे काही दिवस ‘निफ्टी’ १२,००० ते १२,३०० अंश या पातळीत घनत्व बनवत राहण्याची शक्‍यता आहे.

                        
‘निफ्टी’ची चाल कशी असेल?
मागील शुक्रवारी ‘निफ्टी’ १२,२७१ अंश या पातळीवर बंद झाला आहे. या आठवड्यासाठी १२,३०० व १२,२०० अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. जर ‘निफ्टी’ १२,२०० अंशांच्या खाली घसरून एक तास टिकला, तर पुढे १२,१३० अंशांवर छोटा आधार असून, १२,००० अंशांवर मोठा आधार आहे. जर १२,३०० अंशांवर एक तास टिकला, तर पुढे १२,५०० अंश असे वरचे उद्दिष्ट असेल. या आठवड्यात ‘निफ्टी’ १२,३०० अंशांच्या वर टिकण्याची शक्‍यता नसून, खालच्या १२,००० अंश या पातळीच्या दिशेने घसरण्याची शक्‍यता दिसत आहे. जर १२,००० अंशांपर्यंत ‘निफ्टी’ घसरला, तर ही पातळी बाजारात पुनर्प्रवेश करण्यासाठी उत्तम पातळी असण्याची शक्‍यता आहे. ‘निफ्टी’चे अर्थसंकल्पापर्यंत १२,५०० अंशांचे लक्ष्य असणार आहे.

उत्तम खरेदी
ब्रिटानिया (सध्याचा भाव - 
रु. ३११५, उद्दिष्ट - रु. ३८००)
दैनंदिन वापराच्या वस्तू बनविणारी (एफएमसीजी) ही भारतातील मोठी कंपनी असून, तिचे आजचे बाजारमूल्य ७५,००० कोटी आहे. या कंपनीच्या मालाला बाजारात मोठी मागणी असते व यांची पुरवठ्याची उत्तम साखळी आहे. कंपनीचा माल विक्री करून मिळणारा महसूल सतत वाढत आहे व त्यासोबत नफाही वाढता आहे. उत्तम व्यवस्थापन व मालाचा दर्जा या आधारावर कंपनीने मोठी प्रगती केली असून, शेअरधारकांना सरासरी वार्षिक २० टक्के लाभ दिला आहे. दरवर्षी लाभांशही कंपनी देत असते. १५ ते २० टक्के वार्षिक लाभ व खात्रीशीर गुंतवणूक हवी असल्यास या कंपनीत गुंतवणूक करण्यास हरकत नाही. पुढील एक वर्षात याचा शेअरभाव ३८०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

(डिस्क्‍लेमर - लेखक शेअर बाजाराचे संशोधक-विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासावरून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com