मुंबई : कोविड-19 च्या संकटामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या काळात एकीकडे अर्थ-उद्योग क्षेत्रातील व्यवहार ठप्प झालेले असताना, दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 'जिओ' प्लॅटफार्मवर मात्र गुंतवणुकीचा धनवर्षाव सुरू आहे. कंपनीने आतापर्यंत १.२४ लाख कोटी रुपये उभे केले असून, आणखी ५ ते १० हजार कोटी रुपये उभे करण्याची शक्यता आहे. हे सर्व पाहता कंपनी कर्जमुक्तीच्या दिशेने जोरदार वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.
अर्थविषयक घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रिलायन्स इंडस्ट्रीज आता सौदी अरेबियातील पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडाबरोबर (पीआयएफ) चर्चा करीत असून, त्यांच्याकडून प्रारंभी सुमारे ५ हजार कोटी रूपयांच्या निधीबाबत निर्णय होऊ शकतो. हा साधारणपणे १ टक्के हिश्श्यासाठीचा निधी असू शकतो, असे समजते. साधारणपणे एवढ्याच रकमेचा निधी उभारण्याचा प्रयत्न याच वर्षी केला जाऊ शकतो. तसे झाल्यास कंपनी नियोजित उद्दिष्टापूर्वीच कर्जमुक्त होऊ शकते. "रिलायन्स जिओ'वर रोजच धन वर्षाव सुरू आहे. आता लवकरच रिलायन्स रिटेलच्या ऑनलाईन ऑर्डरिंग प्लॅटफर्म जिओ मार्टचे कामकाज सुरू होत आहे.
किती जमवला पैसा?
अर्थविषयक घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
परिणाम काय होणार?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.