टिप्स : विकेल तोच टिकेल!

share
share

तेजी-मंदी हा शेअर बाजाराचा मूळ गुणधर्म आहे. अनेकदा सर्वसामान्य गुंतवणूकदार हे दरवेळी सांगतात, की आमच्याकडून शेअरविक्रीचा निर्णयच घेतला जात नाही. ज्याप्रमाणे खरेदीला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे विक्रीलासुद्धा महत्त्व आहे. 

उदाहरणार्थ, आपण एखादा शेअर १०० रुपयांना घेतो आणि त्यासाठी २०० रुपयांचे लक्ष्य ४ ते ५ वर्षांसाठी ठेवतो. परंतु, जर त्या शेअरने केवळ १ किंवा २ वर्षांतच तो टप्पा गाठला, तर आपल्याला वाटते, की तो अजून वर जाईल व त्यामुळे तो आपल्याकडून विकला जात नाही. अनेकदा तो अजूनही वर जातो व तेव्हाही विकणे होत नाही आणि काही कारणास्तव बाजार कोसळल्यास आणि तो शेअर जोरात खाली आल्यास आपल्याला वाटते, की आपण तर या शेअरचा बराच मोठा भाव पाहिलेला आहे, आता एवढ्या कमी भावात कसे विकायचे? त्यामुळे इच्छित परतावा अतिशय कमी वेळेत मिळाला असेल तर तो शेअर काही प्रमाणात विकण्याचा विचार करायला हवा. नंतर बाजार कोसळल्यास पश्चात्ताप होत नाही. जो शेअर वरच्या भावात विकला आहे, तोच शेअर परत मोठ्या फरकाने खाली आला असेल, तर पुन्हा खरेदी करता येतो अथवा बाजार जोरात वर गेल्यास आपण केवळ अंशतःच विक्री केली असल्याने बाकीच्या शेअरमध्ये आपल्याला फायदा होतोच!

एकूणच काय, तर शेअरमध्ये होणारा नफा हा केवळ कागदोपत्री न ठेवता वेळोवेळी पदरात पाडून घेतला पाहिजे. कारण शेवटी ‘विकेल तोच टिकेल!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com