
नवी दिल्ली - बॅंकेत होणारे गैरव्यवहार शोधून काढण्यासाठी अवलंबली जाणारी नवीन पद्धत आणि बॅंकांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने उचललेली पावले यामुळे बॅंकांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. ते राज्यसभेत बोलत होते. चालू आर्थिक वर्षात पहिल्या नऊ महिन्यांत बॅंकांतील गैरव्यवहार घटून ५,२४४ कोटींवर आल्याचे त्यांनी सांगितले.
मागील दशकभरात झालेल्या गैरव्यवहारांची आकडेवारी ठाकूर यांनी सादर केली. त्यानुसार, २००९-१४ या कालावधीत एकूण गैरव्यवहारांचे प्रमाण ०.५८ टक्के इतके होते; तर पुढे अडीच वर्षांत हे प्रमाण ०.१६ टक्क्यांवर आले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत त्यात आणखी घट होत हा आकडा ०.०४ टक्क्यांवर आला. २०१६-१७ मध्ये एकूण ३८,५४८ कोटींचे गैरव्यवहार झाले होते. त्यात घट होऊन २०१७-१८ मध्ये १६,०८४ कोटींचे गैरव्यवहार समोर आले होते. तुलनेत २०१८-१९ मध्ये त्यात वाढू होऊन हा आकडा १८,८९३ कोटींवर गेला होता. मात्र चालू आर्थिक वर्षात त्यात लक्षणीय घट झाली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराचे प्रमाणदेखील घटले असल्याचे त्यांनी नमूद करून आकडेवारी सादर केली. २०१६-१७ मध्ये ३५,५७८ कोटींवरून २०१८-१९ मध्ये फक्त १५,५७५ कोटींचे गैरव्यवहार आढळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन तिमाहीत हे प्रमाण ३,७८१ कोटींवर आल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.