

Buddha Purnima
esakal
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गोतम बुद्धांच्या ‘कालामसुत्त’ या विचारांची ओळख करून देताना त्यांच्या विवेक स्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. त्यांची बुद्धपौर्णिमेनिमित्त घेतलेली मुलाखत
डॉ. साळुंखे : कालामसुत्त हा बुद्धांचा एक कालातीत उपदेश आहे. तो सार्वकालिक आणि सार्वत्रिक आहे. त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो. प्राचीन काळी कालाम या नावाचे काही लोक होते. ते कोसल प्रदेशातील एका बाजारपेठेच्या गावात राहात होते. बुद्ध एकदा आपल्या भिखू संघासोबत चारिका करीत त्या गावात पोहोचले. बुद्ध आपल्या गावात आले आहेत, हे समजल्यावर कालाम लोक त्यांच्याविषयीच्या आदरापोटी त्यांना भेटायला आले.