danish siddiqui journalism award justice madan lokur
sakal
नवी दिल्ली - `ब्रिटिशांच्या काळात वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बरीच बंधने होती. त्या काळात ब्रिटिशांच्या धोरणांवर टीका केल्यामुळे बाळ गंगाधर टिळक यांच्यावर देशद्रोहाचा खटला करण्यात आला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते, की वृत्तपत्र स्वातंत्र्य हे वाणीस्वातत्र्यांच्या अंतर्भूत आहे. राज्यघटना तयार करताना विधिमंडळात झालेल्या चर्चेत त्यांनी ते मांडले व सर्वोच्च न्यायालयाने 1950 मध्ये ते स्वीकारले, असे विचार दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल जस्टीस कौन्सिलचे विद्यमान अध्यक्ष मदन भिमराव लोकूर यांनी व्यक्त केले.