

Thomas Candy
sakal
पुण्यात विश्रामबागवाडा येथे १८२१ साली संस्कृत (हिंदु) कॉलेज स्थापन झाले तेव्हा पुढील अनेक वर्षे ते केवळ ब्राह्मण लोकांसाठीच होते. या कॉलेजातील शिक्षक आणि विद्यार्थीदेखील फक्त ब्राह्मणच असतील असा एक नियमच होता. याचे कारण म्हणजे पुण्यातील पेशवाई नुकतीच - तीन वर्षांपूर्वीच - संपली होती आणि उच्च शिक्षण समाजातील सर्व घटकांना खुले करुन शहरात बहुसंख्य असलेल्या ब्राह्मण समाजाचा राग ओढवून घेण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारची मुळीच इच्छा नव्हती.