Delhi Election Result 2025: जन आंदोलनातून उभा राहिलेल्या पक्षाची अवस्था अशी का झाली? केजरीवाल चुकत गेले अन्...

Arvind Kejriwal: ..हे आंदोलन एवढे व्यापक होते की, संसदेत लोकपाल विधेयक मांडण्यास भाग पाडले गेले. मात्र, आंदोलनाच्या पुढील टप्प्यात तेवढेच महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले—हा लढा राजकीय बदलासाठी आहे की केवळ एका कायद्यापुरता मर्यादित आहे? शेवटी, अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
Delhi Election Result 2025: जन आंदोलनातून उभा राहिलेल्या पक्षाची अवस्था अशी का झाली? केजरीवाल चुकत गेले अन्...
Updated on

भारताच्या राजकीय इतिहासात विविध आंदोलनांनी नव्या संधी आणि आव्हाने निर्माण केली आहेत. १९७५ मधील आणीबाणीच्या काळात जनता दलाने प्रभाव टाकला, तर १९९० च्या दशकात भाषावार प्रांतरचनेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. यामुळे भारताच्या राजकीय व्यवस्थेचा प्रवाह बदलला. अशाच एका नव्या लाटेचा उदय २०११ च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून झाला, आणि त्यातूनच आम आदमी पक्ष (AAP) जन्माला आला. मात्र, सत्तेच्या शिखरावर पोहोचलेल्या या पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ताज्या पराभवाने विचार करण्यास भाग पाडले आहे,आंदोलनातून पक्ष बनवणे सोपे, पण तो दीर्घकाळ टिकवणे कठीण, हे या निकालातून दिसून येतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com