
भारताच्या राजकीय इतिहासात विविध आंदोलनांनी नव्या संधी आणि आव्हाने निर्माण केली आहेत. १९७५ मधील आणीबाणीच्या काळात जनता दलाने प्रभाव टाकला, तर १९९० च्या दशकात भाषावार प्रांतरचनेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. यामुळे भारताच्या राजकीय व्यवस्थेचा प्रवाह बदलला. अशाच एका नव्या लाटेचा उदय २०११ च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून झाला, आणि त्यातूनच आम आदमी पक्ष (AAP) जन्माला आला. मात्र, सत्तेच्या शिखरावर पोहोचलेल्या या पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ताज्या पराभवाने विचार करण्यास भाग पाडले आहे,आंदोलनातून पक्ष बनवणे सोपे, पण तो दीर्घकाळ टिकवणे कठीण, हे या निकालातून दिसून येतेय.