दक्षतेने महाराष्ट्र बचावला; वसईत होणार होता तबलिगी जमातचा कार्यक्रम

Corona-Danger
Corona-Danger

मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने दक्षता घेतली नसती तर मुंबई  आणि महाराष्ट्र कोरोनाच्या महाभयंकर साथीने वेढला असता अशी माहिती समोर आली आहे. तबलिगी जमातच्या मरकजसाठी वसईचे ठिकाण निवडण्यात आले होते, परंतु राज्य सरकारने परवानगी नाकारल्याने हा कार्यक्रम दिल्लीत झाला.

तबलिगी जमातच्या मरकज या कार्यक्रमासाठी मुंबई जवळील वसई येथे परवानगी देण्यात आली होती. जानेवारीमध्ये पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी या कार्यक्रमाला परवानगीही दिली होती. मात्र कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पालघर पोलिस अधीक्षकांसोबत बैठक घेतली. या तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला किती लोक येणार आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला. यावेळी हजारोंच्या संख्येने देशभरातून या समाजाचे लोक उपस्थित राहणार असून परदेशातील अनेक राष्ट्रांमधून शेकडो लोक येणार असल्याची माहिती समोर आली. या माहितीमुळे गृहविभाग हवालदिल झाला. गृहमंत्री अनिल देशमुख,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संबंधित कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.  दरम्यान कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com