

Jalgaon Crime News
esakal
जळगाव : शहरातील मेहरुणच्या रेणुकानगरातील रहिवासी कविता अरुण मिस्तरी (वय ३८) ८ सप्टेंबरपासून बेपत्ता झाल्या होत्या. गल्लीतील मैत्रिणींशी त्या रात्री अकराला व्हिडिओ कॉलवर बोलल्या होत्या. पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करूनही शोध लागत नव्हता, म्हणून मैत्रिणींनी जंगलात जाऊन कविताचा शोध सुरू केल्यावर रविवारी (ता. १३) रात्री पद्मालयाच्या जंगलात मृतदेह आढळला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक झाली आहे.