संवाद : शंकानिरसन

अभ्यासाच्या वेगाला नियंत्रित करत असतात, अडथळा ठरत असतात
Dialog
Dialogsakal

अभ्यासाच्या वेगाला नियंत्रित करत असतात, अडथळा ठरत असतात अशा अनेक बाबी आहेत. अभ्यासाला सुरुवात केली की आपल्याला समजत नाही असे वाटायला लागते, काही आठवेनासे होते, संकल्पनाच कळत नाही, वाचलेले समजत नाही, कशाला महत्त्व द्यायचे आणि कशाला नाही हेच ठरत नाही. अभ्यासाला वेळ तर नेहमीच कमी पडतो, अजून अभ्यास झालाच नाही असे वाटत राहते. अशा या भांबावलेल्या अवस्थेतून केवळ पाल्याबरोबर पालकही जात असतात. प्रश्नांचे डोंगर अभ्यास करणाऱ्यांच्या समोर उभे असतात. अशा अवस्थेत आपण काय करतो ते महत्त्वाचे.

मनात आलेल्या शंका, कुशंका, प्रश्न, समस्या, अडचणी, विवाद्य अशा जागा यांचे आपण काय करतो? बऱ्याच वेळा त्या आपल्या डोक्यात ठेवूनच आपण दिवस ढकलत असतो. अशा वृत्तीमुळे मात्र या शंकांचा भस्मासुर व्हायला वेळ लागत नाही. अशा वेळेस करायचे काय हेच समजत नाही. म्हणूनच आपल्या मनात येणारी कोणतीही छोटी शंका ही मोठ्या समस्ये मागचे कारण असू शकते हे जाणून ती वेळचेवेळी सोडवून घेणे महत्त्वाचं.

शंका येणं, समस्या भेडसावणं हे आपण अभ्यास करत असल्याचे पहिलं सकारात्मक लक्षण आहे. याचा अर्थ तुम्ही शिकत आहात. ही प्रक्रिया फार महत्त्वाची. जो शिकतो त्याला शंका येतात आणि जो अभ्यासच करत नाही तो मात्र या सर्वांपासून मुक्त असतो. त्यांच्या विषयी लाज बाळगून कसे चालेल. उलट त्यांचा स्वीकार करून त्यांना अपेक्षित उत्तर, निरसन करून घेणं जमलं पाहिजे. अर्थात अशा निरसनाचे मार्ग, स्रोत आपण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचे. आपली नक्की समस्या काय आहे हे समजणे प्रथमतः आवश्यक आहे. अनेक वेळा आपली समस्या काय आहे हेच समजत नाही, चुकतय कुठे हेच कळत नाही. त्यानंतर ती समस्या मांडायची कशी आणि कुणापुढे हे समजत नाही. त्यासाठी खालील टप्प्यांचा विचारात घेता येतील.

निरसनाचे टप्पे

समस्या समजून घेणं आणि त्या समस्येमागच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक असते. समजत नाही या मागचं कारण कदाचित आपण अगोदरच्या पाठाला गैरहजर राहिल्याने आपला पाया कच्चा राहिला आहे, संकल्पनेमागची पार्श्वभूमीच आपली तयार झालेली नाही. मग त्या विषयी समजून घेतलं की झालं.

आपल्याला वाटणाऱ्या समस्येविषयी भरपूर चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. आपली समस्या असल्यामुळे त्याला उत्तरही आपणच शोधणं आवश्यक आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या तयार उत्तरांपेक्षा आपण घेतलेला शोध महत्त्वाचा.

जेव्हा-जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इतरांशी त्या समस्येविषयी विचार विनिमय करणे फायद्याचे ठरते. कदाचित चर्चेतून उत्तर सापडण्याची शक्यता असते. आपले विचार आपल्या डोक्यात ठेवून काहीच होणार नसते.

समस्येचे विविध अंगांनी विश्लेषण करा. त्यातूनच उत्तर सापडते. अभ्यासात समस्या, कारणे, परिणाम, विश्लेषण, पृथ्थकरण, निष्कर्ष, शोध या सारख्या प्रक्रियेला स्थान दिल्यास आपण निरसन प्रक्रियेत स्वतःला सिद्ध करू शकाल. अभ्यासात निरसन करून घ्यायला योग्य ते स्थान द्या. त्यापासून पळून जाऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com