Hartalika : अध्यात्मातून पर्यावरण, आयुर्वेदाला जोडणारी ‘हरतालिका’

प्रत्येक सण, उत्सव, व्रत-वैकल्प, उपवास हे आध्यात्म्याला जोडत असले तरी यामागे शास्त्र आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचे नाते हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे.
Hartalika
Hartalikasakal

- प्रमिला चोरगी

सोलापूर - प्रत्येक सण, उत्सव, व्रत-वैकल्प, उपवास हे आध्यात्म्याला जोडत असले तरी यामागे शास्त्र आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचे नाते हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे. आज हरतालिका व्रत आहे. हरतालिका व्रत सर्व विवाहित महिला व तरुणी विशेष असते. या व्रतामागील आध्यात्मिक आख्यायिका सर्वज्ञात आहेच.

त्याचबरोबर हरतालिका व्रत हे पर्यावरण, आयुर्वेदाचे महत्त्वाचे पटवून देणारी आहे. या पूजेसाठी शिवाला १६ प्रकारचे पत्री (पाने) अपर्ण केले जाते. या १६ पत्रकारामध्ये काही झाडे ही ऑक्सिजनयुक्त पर्यावरण पूरक आहे. तर यातील अनेक झाडांना, पानांना आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे.

हरतालिका व्रत सर्व विवाहित महिला व तरुणी विशेष असते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला हरतालिकेचे व्रत पाळले जाते. यंदा शिवाचा वार सोमवारी आणि हरतालिका असा योग जुळून आला आहे. या व्रतामध्ये विवाहित स्त्रिया देवी पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करतात प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते.

तर तरुणी चांगला पती मिळो, यासाठी या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केले जाते. मात्र या व्रताला अध्यात्मा बरोबरच पर्यावरण आणि आयुवैदाची जोड आहे. अध्यात्मातून पर्यावरण, आयुर्वेदाला जोडणारी ''हरतालिका'' व्रत आहे.

अशी आहे आख्यायिका

पूर्वकाली पर्वतराजाची कन्यापार्वतीला शंकराला प्राप्त करायचे होते. शिवशंकराला मिळविण्यासाठी तिने अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा करत शंकराचे तप केले. तो दिवस भाद्रपद मासातील तृतीया व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास केला. तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी हरतालिकेची आख्यायिका आहे.

हरतालिकेच्या पूजेला लागणारे साहित्य

हरतालिकेच्या पूजेसाठी रेती, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरे फुलं, १६ प्रकारच्या झाडांची १६ पाने वाहतात. तसेच शिवाला प्रिय असलेले फळभाज्या, त्याचबरोबर बांगड्या, काजळ, कुंकू सौभाग्य साहित्य वाहिले जाते. घरातील हरतालिका पूजेसाठी, प्रथम गंगाजल वापरून पूजा चौकीची साफसफाई करावी आणि नंतर नैसर्गिक माती किंवा वाळूने माता पार्वती, भगवान शिव आणि गणेश यांच्या प्रत्येकी एक अशा तीन मूर्ती बनविले जातात. त्याची पूजा केली जाते.

१६ प्रकारच्या झाडांचे अन्‌ पानाचे महत्त्व

गणेशला वाहण्यात येणारा आघाडा, दूर्वा, शिव वाहणारा धोतरा, अशोक, बुकळा, बेलपत्र, मालती, हनुमानाचे आवडते रुई, विष्णूप्रिय तुळस, मुनीपत्र, दाडिमी, धोतरा, चंपक, करवीर, बदरी, मुरुबक आदी १६ प्रकारच्या झाडांची पाने हरतालिकेदिवशी वाहण्याची परंपरा आहे. या झाडांचे महत्व आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि ऑक्सिजन निर्मितीला उपयुक्त असे पर्यावरणापूरक झाडे आहेत.

हरतालिका ही शंकरासारखा पती मिळावा यासाठी तरुणी हे व्रत करतात. हा झाला अध्यात्माचा भाग. श्रावण महिन्यात निसर्गात उपलब्ध होणारे पाने, फुले, फळ, फळभाज्यादेखील शिवाला अर्पण केले जाते. यात प्रामुख्याने शिवाला विविध १६ प्रकारची पाने-फुले, फळभाज्या अर्पण करतात.

या व्रताच्या निमित्ताने शिवाला अपर्ण करण्यात येणाऱ्या झाडांची पाना-फुलांची पर्यावरण आणि आरोग्याच्यादृष्टीने असलेले महत्व, झाडांविषयीचे ज्ञान व निसर्गाची ओळख करून देणारा हा हरितालिका व्रत आहे.

- मोहन दाते, पंचागकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com