वारीमध्ये टाळाला इतके महत्व का आहे ? एक असे मंदिर जिथे करतात दगडी टाळाची पूजा ! जाणून घ्या टाळाची गोष्ट...

Ashadhi Wari Special: टाळाटाळीं लोपला नाद ।अंगोअंगी मुराला छंद...पालखी सोहळ्यात जेव्हा हजारो वारकरी एकत्र टाळ वाजवून नाचतात, तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा हा साक्षात नादब्रह्माचा अनुभव असतो.
350 Year Old Taal Tradition

350 Year Old Taal Tradition

esakal 

Updated on

वारकरी संप्रदायामध्ये भजन आणि कीर्तनाला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व टाळ, मृदंग आणि विणेला आहे. टाळाच्या आवाजाशिवाय वारी पूर्ण होऊ शकत नाही. टाळाला प्रत्यक्ष विठ्ठल स्वरूप मानलं गेलंय, पण तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्रात एक असे गाव आहे ज्याला 'टाळगाव' म्हटले जाते आणि तिथे दगडी टाळाची पूजा केली जाते! पुणे जिल्ह्यातील चिखली येथील हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव 'टाळ मंदिर' म्हणून प्रसिद्ध आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने देहू आणि आळंदीला जाणारे भाविक या पवित्र मंदिराला आवर्जून भेट देतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com