भाद्रपद शुध्द तृतियेला हरतालिकेचे व्रत केले जाते. या व्रताने पार्वतीला भगवान शंकराची पती म्हणून प्राप्ती झाली असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी अविवाहित मुलिंनी वांछीत पती मिळवण्यासाठी हे व्रत करावे तर विवाहित महिलांनी पतीच्या दीर्घयुष्यासाठी करावे असे मानले जाते. या व्रताला सर्वात पवित्र व प्रभावी व्रत मानले गेले आहे. त्यामुळे हे व्रत एकदा सुरू केले की, आयुष्यभर निभवावे असे संकेत आहेत. तसेच या दिवशी काही दानपुण्य केले तर धनलाभ होतो असे म्हणतात.
जाणून घेऊ कोणते दान करावे
कपडे
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. त्यामुळे अन्न व वस्त्राचे दान श्रेष्ठ समजले जाते. हरतालिकेला महिलांनी गरीब ब्राह्मण महिलेला कपडे दान करावे.
श्रृंगार
हरतालिका हे व्रत सौभाग्याचे व्रत असल्याने या दिवशी सौभाग्याच्या लेण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे या दिवशी श्रृंगाराचे साहित्य दान करणे शुभ मानले जाते.
तांदूळ
तांदूळ हे सुबत्तेचे व लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे तांदळाचे दान करणे शुभ मानले जाते.
धन-धान्याने घर भरलेले असावे असे प्रतिकात्मक म्हणून गव्हाला शुभ मानले जाते. म्हणून आपल्या घरातला थोडा भाग ब्राह्मणाला दान करणे शुभ असते. असे केल्याने घरात धनाची आवक वाढते.
फळे
या दिवशी फळांचे दान करणे फार चांगल् समजले गेले आहे. याबरोबरच उडिद आणि हरभऱ्याच्या डाळीचे दान शुभ समजले जाते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.