
पितृपक्षाच्या काळात घर स्वच्छ ठेवणे आणि तुटलेल्या वस्तू काढून टाकणे आवश्यक आहे. बंद पडलेली घड्याळे, तुटलेली भांडी आणि तुटलेल्या मूर्ती घरात ठेवल्यास पूर्वजांचा आशीर्वाद मिळत नाही. अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतात, त्यामुळे पितृपक्षापूर्वी त्यांचे विसर्जन करणे किंवा घरातून काढून टाकणे महत्त्वाचे आहे.
Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात पितृपक्षाला खुप महत्व आहे. पितृपक्षाच्या १५ दिवसांत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पिंडदान किंवा तर्पण केले जाते. असं मानलं जातं की पितृपक्षाच्या वेळी मृत नातेवाईकांचे आत्मे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी येतात. यामुळे याकाळात घर स्वच्छ आणि शुद्ध ठेवले पाहिजे. तसेच अशा नकारात्मक गोष्टी घरातून काढून टाकल्या पाहिजेत, ज्या पूर्वजांना आवडत नाहीत.