
Pitru Paksh 2022: हिंदुधर्मात पितृ पंधरवड्याला खूप महत्त्व आहे, तितकेच सर्वपितृ अमावस्येला देखील आहे. सर्वपितृ अमावस्या ही पितरांचे श्राद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. पितरांना नैवेद्य ते दान-पुण्य आणि तंत्र-मंत्र सिद्धीसह विविध कामांसाठी अमावास्येला विशेष महत्त्व आहे.
प्रत्येक महिन्याला अमावस्या येत असून यात भाद्रपद अमावास्येचे वेगळे महत्त्व आहे. कारण भाद्रपद अमावस्येला सर्वपितृ अमावस्या असे संबोधले जाते. यंदा 25 सप्टेंबरला सर्वपितृ अमावस्या आहे. या दिवसाला अमावस्या श्राद्ध असे देखील म्हटलं जाते. आपल्याकडे सर्वपितृ अमावस्या तिथी ही पितरांचे श्राद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. परंतु एखाद्याला आपल्या पुर्वजाच्या मृत्यूची तिथी माहित नसते. त्यामुळे ते सर्वपितृ अमावस्येला श्राद्ध करू शकतात.
हिंदू धर्मात तर्पण आणि पिंड दानाचे काय आहे महत्त्व...
● पितृपक्षात दररोज तर्पण करावे.
● तुम्ही हे करू शकले नसाल तर सर्वपितृ अमावस्येला पाण्यात दूध, जव, तांदूळ आणि गंगाजल घालून तर्पण करावे.
● या दरम्यान पिंड देखील दान करावे.
● भात, दूध आणि तीळ यांना एकत्र करून पिंड बनवले जातात.
● भाद्रपद अमावस्येला अमावस्या पिंड दानासाठी विशेष महत्त्व असते.
सर्वपितृ अमावस्येला पितृ विसर्जनी अमावस्या किंवा महालय असे देखील संबोधले जाते. म्हणून या दिवशी तुम्ही तिर्थस्थळी जावून पिंडदान करू शकतात. सर्वपितृ अमावस्येला पूर्वज आपल्या प्रियजनांच्या दारापर्यंत श्राद्धाची इच्छा घेऊन येतात. त्यांना पिंडदान मिळाले नाही तर ते शाप देऊन निघून जातात. परिणामी घरात कलह निर्माण होती. कौटुंबिक शांतता भंग होते. झालेली कामेही बिघडू शकतात.
आता बघू या श्राद्धाचे 12 प्रकार कोणते आहेत ?
1) नित्य श्राद्ध : कोणताही व्यक्ती अन्न, जल, दूध, कुश, पुष्प आणि फळाने दररोज श्राद्ध करून पितरांना प्रसन्न करू शकतो.
2) नैमित्तक श्राद्ध : वडील किंवा एखाद्याच्या मृत्यू तिथीला हे श्राद्ध केले जाते. त्याला एकोद्दिष्ट असे म्हणतात. या श्राद्धादरम्यान केवळ एक पीडनदान केले जाते. विश्वदेवाचे पूजन केले जात नाही.
3) काम्य श्राद्ध :पुत्रप्राप्ती किंवा धनप्राप्तीसारख्या विशेष इच्छापूर्तीसाठी हे श्राद्ध केले जाते.
4) वृद्धी श्राद्ध :सुख आणि सौभाग्य वृद्धीसाठी हे श्राद्ध केले जाते.
5) सपिंडन श्राद्ध : मृत व्यक्तीच्या 12 व्या दिवशी हे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध स्त्रियासुद्धा करू शकता.
6) पार्वण श्राद्ध : हे श्राद्ध पर्व तिथीला केले जाते. त्यामुळे याला पार्वण श्राद्ध असे म्हणतात. वडील, आजोबा, पंजोबा, आजी, पणजीसाठी हे श्राद्ध केले जाते.
7) गोष्ठी श्राद्ध : हे श्राद्ध कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन श्राद्ध करतात त्याला गोष्टी श्राद्ध असे म्हणतात.
8) कर्मांग श्राद्ध : एखाद्या संस्काराच्या निमित्ताने केले जाणाऱ्या श्राद्धाला कर्मांग श्राद्ध म्हटले जाते.
9) शुद्धयर्थ श्राद्ध : पितृ पश्रात केले जाणारे हे श्राद्ध कुटुंबाच्या शुद्धीसाठी केले जाते.
10) तीर्थ श्राद्ध :एखाद्या तीर्थस्थळी जे श्राद्ध केले जाते त्याला तीर्थ श्राद्ध असे म्हणतात.
11) यात्रार्थ श्राद्ध : एखादी यात्रा यशस्वी होण्यासाठी केले जाणाऱ्या श्राद्धाला यत्रार्थ श्राद्ध असे म्हणाता.
12) पुष्टयर्थ श्राद्धःशरीर स्वास्थ्य आणि सुख-समृद्धी आणि आर्थिक उन्नतीसाठी त्रयोदशी तिथी, मघा नक्षत्र, वर्षा ऋतू, भाद्रपद मासातील कृष्ण पक्षात हे श्राद्ध केले जाते.
सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे ठेवा लक्ष ठेवाव्यात?
● सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केस, नखे आणि दाढी कापू नये.
● शास्त्रात असे करणे अशुभ मानले गेले आहे.
● हिंदू धर्मात कोणाचा मृत्यू झाल्यास केस कापण्याची प्रथा आहे.
● पितृपक्षात केस कापू नयेत.
● सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी मुंडन, गृह प्रवेशासारखी मांगल्यकार्ये करू नका.
● या दिवशी घरासाठी महत्त्वाचे असलेल्या गोष्टींची खरेदी करू नका.
● नवे कपडे अथवा कोणत्याही प्रकारची खरेदी नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.