
नवी दिल्ली: बुधवारी पहाटे पाकिस्तानच्या लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर (LoC) अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केला. या भ्याड हल्ल्यात तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय लष्कराने याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला मोठे नुकसान पोहोचवले आहे. हा हल्ला भारताने नुकत्याच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या दहशतवादविरोधी मोहिमेनंतर घडला आहे, ज्यामुळे सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे.