5G Spectrum Auction : 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची प्रक्रिया सोमवारी संपली असून या लिलाव प्रक्रियेत चार दूरसंचार कंपन्यांनी 1,50,173 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली, जी सरकारच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलै 2022 रोजी सुरू झाला, जो 7 दिवस चालला.
रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्क्स या कंपन्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी झाल्या आहेत. पहिले 6 दिवस चाललेल्या या लिलावात 1,50,153 कोटी रुपयांची बोली लागली. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने वेगवेगळ्या बँडमध्ये स्पेक्ट्रमसाठी आक्रमकपणे बोली लावली असल्याचे मानले जाते. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लिलावात ठेवलेल्या सर्व बँडसाठी चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. 2016 आणि 2021 मध्ये झालेल्या लिलावात या बँडसाठी कोणीही खरेदीदार नव्हता. मात्र, 5G स्पेक्ट्रम लिलावात लागलेली 1,50,173 कोटी रुपयांची बोली सरकारच्या स्वतःच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. तसेच, 2015 मध्ये लिलावातून मिळालेल्या 1.09 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी महसुलापेक्षा देखील ती अधिक आहे.
दरम्यान एकदा टेलिकॉम कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम वाटप झाल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G मोबाइल सेवा सुरू होईल. मात्र, 5G मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतर मोबाइल टेलिफोन आणि इंटरनेटचे जग बदलून जाईल असे बोललो जात आहे. 5G चा स्पीड 4G पेक्षा 10 पट जास्त असेल असे सांगितले जात आहे. 5G सेवा सुरू झाल्यानंतर ऑटोमेशनचे नवे पर्व सुरू होईल. ज्या गोष्टी आतापर्यंत मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित होत्या, त्या खेड्यापाड्यांपर्यंत उपलब्ध होतील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.