Morena Shootout : जमिनीच्या वादाचा रक्तरंजित शेवट! लागोपाठ पडले एकाच कुटुंबातील सहा मुडदे

6 people shot dead during clash morena village  in madhya pradesh know paan singh tomar connection
6 people shot dead during clash morena village in madhya pradesh know paan singh tomar connection

Morena Shootout News : मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील लेपा गावात शुक्रवारी सकाळी रक्तरंजित संघर्ष घडल्याने खळबळ उडाली आहे. लेपा गावातील धीरसिंह तोमर आणि गजेंद्रसिंह तोमर यांच्यात सुमारे १० वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी सहा जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे सर्व मृत एकाच कुटुंबातील होते.

मिळालेल्या माहितीनुसार या कुटुंबात यापूर्वीही रक्तरंजित संघर्ष झाला होता. ज्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान सध्या या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा शोध सुरू आहे. ज्या गावाची हत्या झाली त्या गावाला लागूनच भिडोसा गाव आहे. दोन्ही गावे जोडून ते लेपा-भिडोसा म्हणून ओळखले जाते. भिडोसा हे गाव पान सिंग तोमर यांचे गाव आहे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गावातील दोन कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. या हल्ल्यात ३ पुरुष आणि ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

6 people shot dead during clash morena village  in madhya pradesh know paan singh tomar connection
Sachin Tendulkar : सचिनने शेअर केला बायको अन् लेकीसोबतचा चुल पेटवतानाचा फोटो; अर्जुनची आठवण काढत म्हणे…

मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादानंतर पान सिंह तोमर यांनीही बंड केले होते. एकेकाळी सैन्यात असताना देशासाठी पदक मिळवून देणाऱ्या पानसिंग तोमर यांच्या जमिनीवर गुंडांनी अतिक्रमण केले होते. त्यानंतर पान सिंह तोमरने बंदूक उचलली. पान सिंग तोमर यांच्या शेजारच्या गावात झालेल्या या हत्याकांडानंतर पुन्हा एकदा लोकांना पान सिंग तोमरची आठवण येऊ लागली आहे. दिमानी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र तोमर हे देखील भिडोसा गावचे रहिवासी आहेत.

6 people shot dead during clash morena village  in madhya pradesh know paan singh tomar connection
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली रश्मी अन् तेजस ठाकरेंची भेट? श्रीकांत शिंदे म्हणतात...

गाव सोडून आरोपी फरार

घटनेनंतर आरोपी गाव सोडून फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. लेपा गावात झालेल्या या रक्तरंजित संघर्षानंतर गावात दहशतीचे वातावरण आहे. दोन कुटुंबात २०१३ पासून वाद सुरू आहे. १० वर्षांपूर्वी झालेल्या रक्तरंजित संघर्षात धीर सिंग यांच्या कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाला होता.

गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

शुक्रवारी झालेल्या या हत्याकांडात गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या भांडणाक एका बाजूने लाठीहल्ला करण्यात आला, त्यानंतर एक तरुण बंदूक घेऊन आला आणि त्याने गोळीबार सुरू केला. तरुणाने एकामागून एक अनेक राऊंड गोळीबार करून ६ जणांना ठार केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com