
मुंबई : ‘‘करचोरी, करगळती रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक काम करावे. कोणीही कर्तव्यात हयगय केल्यास खपवून घेणार नाही,’’ असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. अर्थ व नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क मंत्रिपदांची सूत्रे हाती घेताच त्यांनी मंगळवारी दोन्ही विभागांची मंत्रालयात बैठक घेत सूचना दिल्या. राज्यातील बेकायदा दारूविक्रीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले.