

Balushahi
esakal
उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्याला स्वतःची एक वेगळी सांस्कृतिक आणि खाद्यसंस्कृतीची ओळख आहे. याच परंपरेतील एक गोड आणि अद्भूत नजराणा म्हणजे आंबेडकर नगर (Ambedkar Nagar) जिल्ह्याची जगप्रसिद्ध 'बालूशाही' (Balushahi)! आपल्या खुसखुशीत थरांसाठी, हलक्या कुरकुरीतपणासाठी आणि आतपर्यंत साखरेच्या पाकात आकंठ बुडलेल्या मिठास चवीसाठी ही बालूशाही वर्षानुवर्षांपासून खवय्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
पारंपारिक पद्धतीने तयार केली जाणारी ही मिठाई बाहेरून हलकी कुरकुरीत आणि आतून अत्यंत मऊ व रसाळ असते, जी तिला इतर मिठाईंपेक्षा पूर्णपणे वेगळी ओळख मिळवून देते.