
द्वारका : पायी तीर्थयात्रा करण्याची भारतीयांची परंपरा उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र व रिलायन्स समूहाचे संचालक अनंत अंबानी यांनीही जपली आहे. अंबानी कुटुंबीयांचे मूळ गाव असलेल्या जामनगर पासून द्वारकेपर्यंतचे १७० किलोमीटरचे अंतर त्यांनी चालत पूर्ण केले. अनंत अंबानी यांनी द्वारकाधीशाचे दर्शन घेत आपली पदयात्रा नियोजनापेक्षा दोन दिवस आधीच पूर्ण केली. अनंत अंबानी यांची पदयात्रा म्हणजे धार्मिक तीर्थाटन, जिद्द आणि श्रद्धेचा अनोखा संगम होता, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.