नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राने विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे..डॉ. विलास डांगरे, चैत्राम पवार, मारुती चितमपल्ली यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केले आहेत. सरकारने साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य यासह विविद क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या दिग्गजांचा गौरव केला आहे.चैत्राम पवार यांचं पर्यावरण आणि वनसंवर्धन या क्षेत्रामध्ये मोठं काम आहे.विलास डांगरे हे होमिओपथिक चिकित्सक आहेत. भैरवसिंह चौहाण यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे..कोण आहेत मारुती चितमपल्ली?अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली हे नोकरीच्या निमित्ताने विदर्भात आले आणि विदर्भाचेच झाले. येथील जंगलाशी त्यांची नाळ जुळली. विदर्भ हा वनाने नटलेला प्रदेश आहे. विदर्भाइतकी वनश्रीमंती इतर कुठेही नाही. त्यामुळे विदर्भाचे हे वैभव जगासमोर यायला हवे, याच ध्येयाने त्यांनी विदर्भातील सर्व जंगले पालथी घातली. त्यांनी आदिवसींच्या बोली भाषेतील कितीतरी शब्द मराठी शब्दकोशाला दिले आहेत, ज्या शब्दांचे अर्थदेखील कोणाला माहिती नव्हते. असाच एक शब्द म्हणजे, त्यांचे आत्मकथन 'चकवा चांदण'. .विदर्भातील जंगलातून जे हाती लागले त्याला २५ पुस्तकांच्या रुपाने त्यांनी नागपुरातील घरी शब्दबद्ध केले. मात्र, आता त्यांच्या जीवलग शहरात त्यांना आधार देणारे कुणी नसल्याने या व्रतस्थ अरण्याऋषीला वेदनादायी स्थलांतर करावे लागले. त्यांनी जड अंत:करणाने ऑक्टोबर २०२० मध्ये नागपूर सोडून जन्मगाव सोलापूरची वाट धरली. .मारुती चितमपल्लींचा जन्म -मारुती चितमपल्लींचा जन्म १२ नोव्हेंबर १९३२ ला सोलापूर येथे झाला. त्यांचे वास्तव्य गुजरातीमिश्रित मराठी बोलणार्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणार्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागले. चितमपल्लींच्या वडिलांना वाचण्याची आवड, तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता मारुती चितमपल्लींना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणार्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला, ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले रंगांच्या छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चितमपल्लींच्या उपयोगी पडले. त्यामुळे त्यांना जंगलांची ओढ लागली..अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सोलापूरच्या टी. एम्. पोरे विद्यालयात प्राथमिक, तर नॉर्थकोर्ट टेक्निकल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व तेथून ते इंटरमीजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना इंटरमीजिएट सायन्स पात्रतेनुसार सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, कोईम्बतूर येथे वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला. १९५८–६० या कालावधीत त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वनविभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव(मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर वन विभागातील बोटा, अकोला तालुक्यातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागांमध्ये कामे केली. त्यांनी नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे, पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पं. गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे आणि वैद्य वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले. तसेच त्यांनी जर्मन आणि रशियन या भाषांचे अध्ययन केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राने विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे..डॉ. विलास डांगरे, चैत्राम पवार, मारुती चितमपल्ली यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केले आहेत. सरकारने साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य यासह विविद क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या दिग्गजांचा गौरव केला आहे.चैत्राम पवार यांचं पर्यावरण आणि वनसंवर्धन या क्षेत्रामध्ये मोठं काम आहे.विलास डांगरे हे होमिओपथिक चिकित्सक आहेत. भैरवसिंह चौहाण यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे..कोण आहेत मारुती चितमपल्ली?अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली हे नोकरीच्या निमित्ताने विदर्भात आले आणि विदर्भाचेच झाले. येथील जंगलाशी त्यांची नाळ जुळली. विदर्भ हा वनाने नटलेला प्रदेश आहे. विदर्भाइतकी वनश्रीमंती इतर कुठेही नाही. त्यामुळे विदर्भाचे हे वैभव जगासमोर यायला हवे, याच ध्येयाने त्यांनी विदर्भातील सर्व जंगले पालथी घातली. त्यांनी आदिवसींच्या बोली भाषेतील कितीतरी शब्द मराठी शब्दकोशाला दिले आहेत, ज्या शब्दांचे अर्थदेखील कोणाला माहिती नव्हते. असाच एक शब्द म्हणजे, त्यांचे आत्मकथन 'चकवा चांदण'. .विदर्भातील जंगलातून जे हाती लागले त्याला २५ पुस्तकांच्या रुपाने त्यांनी नागपुरातील घरी शब्दबद्ध केले. मात्र, आता त्यांच्या जीवलग शहरात त्यांना आधार देणारे कुणी नसल्याने या व्रतस्थ अरण्याऋषीला वेदनादायी स्थलांतर करावे लागले. त्यांनी जड अंत:करणाने ऑक्टोबर २०२० मध्ये नागपूर सोडून जन्मगाव सोलापूरची वाट धरली. .मारुती चितमपल्लींचा जन्म -मारुती चितमपल्लींचा जन्म १२ नोव्हेंबर १९३२ ला सोलापूर येथे झाला. त्यांचे वास्तव्य गुजरातीमिश्रित मराठी बोलणार्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणार्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागले. चितमपल्लींच्या वडिलांना वाचण्याची आवड, तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता मारुती चितमपल्लींना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणार्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला, ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले रंगांच्या छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चितमपल्लींच्या उपयोगी पडले. त्यामुळे त्यांना जंगलांची ओढ लागली..अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सोलापूरच्या टी. एम्. पोरे विद्यालयात प्राथमिक, तर नॉर्थकोर्ट टेक्निकल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व तेथून ते इंटरमीजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना इंटरमीजिएट सायन्स पात्रतेनुसार सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, कोईम्बतूर येथे वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला. १९५८–६० या कालावधीत त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वनविभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव(मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर वन विभागातील बोटा, अकोला तालुक्यातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागांमध्ये कामे केली. त्यांनी नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे, पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पं. गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे आणि वैद्य वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले. तसेच त्यांनी जर्मन आणि रशियन या भाषांचे अध्ययन केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.