

नवी दिल्ली : ‘‘दिल्लीत विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. महिला कार्यकर्त्यादेखील यातून सुटलेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी जर डबल इंजिनचे सरकार सत्तेत आले तर हे डबल इंजिन सर्वांना चिरडून टाकणार आहे,’’ असा आरोप ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.