घनी यांना भारतात आश्रय द्यावा; सुब्रह्मण्यम स्वामी

अफगाणिस्तानाचा ताबा तालिबानने घेण्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत.
subramanian swamy
subramanian swamySakal

नवी दिल्ली - अफगाणिस्तानाचा (Afghanistan) ताबा तालिबानने (Taliban) घेण्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) देश सोडून पळून गेले आहेत. ते अन्य देशांकडे आश्रय मागत असताना भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. घनी यांना भारतात (India) आश्रय दिला पाहिजे, असे ट्विट (Tweet) स्वामी यांनी केले आहे. दरम्यान, अफगाण नागरिकांना भारतात यायचे असल्याचे त्यांना केवळ सहा महिन्यांचा व्हिसा दिला जाणार आहे.

घनी यांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आश्रय घेतला आहे. त्याचबरोबर तालिबानने भारतातून सर्व आयात-निर्यातीवर बंदी घातली आहे. अशा स्थितीत भारत-तालिबान संबंधांच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यादरम्यानच सुब्रमण्यम स्वामी यांनी नवे विधान केले आहे.

स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘‘भारताने अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष डॉ. अश्रफ घनी यांना आश्रय द्यावा, त्यांना देशात वास्तव्यासाठी आमंत्रित करावे. ते उच्चशिक्षित आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com