पाटणा : वाढत्या वाहन प्रदूषणामुळे बिहार सरकारच्या पर्यावरण विभागाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून आठवड्यातून किमान एक दिवस पेट्रोल व डिझेलच्या वाहनांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.
राज्याच्या पर्यावरण, वन व हवामान विभागाचे सचिव वंदना प्रेयशी यांनी या वाहनांऐवजी ऑगस्टपासून दर शुक्रवारी इलेक्ट्रिक वाहने, सायकलींचा वापर करण्याची सूचनाही कर्मचाऱ्यांना केली आहे.
त्यांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे, की वाहनांचे वाढते प्रदूषण लक्षात घेऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे, ऑगस्ट महिन्यापासून बिहारच्या पर्यावरण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एकदा पेट्रोल, डिझेलवरील वाहनांऐवजी पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करण्याची सूचना केली आहे.
आपण इलेक्ट्रिक वाहने, सायकल, रिक्षांचा वापर केलाच पाहिजे. त्याचप्रमाणे, शक्य असल्यास कार्यालयात पायी चालत आले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
हवामान बदलाचे परिणाम लोक आता अनुभवू लागले आहेत. त्यामुळे, आम्ही कार्यालयात निदान आठवड्यातून एकदा तरी प्रदूषण करणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या वाहनांचा वापर न करण्याचा निर्णय सामुदायिकरीत्या घेतला आहे. प्रत्येक शुक्रवारी तो अमलात आणला जाईल.
-वंदना प्रेयशी, सचिव, पर्यावरण विभाग
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.