

Balram Jayanti
esakal
भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान बलराम यांची जयंती देशभरात ‘हल षष्ठी’ किंवा ‘हलछठ’ म्हणून साजरी केली जाते. शेती, सामर्थ्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या बलरामांना बुंदेलखंडाच्या संस्कृतीत विशेष स्थान आहे. या परंपरेला तब्बल १,७०० वर्षांचा इतिहास असल्याचे सागर जिल्ह्यातील एरण (Eran) येथील गुप्तकालीन शिल्पांवरून दिसून येते.