
बैतूल जिल्ह्यात वऱ्हाडानं भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला आहे.
बैतूल : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल जिल्ह्यात (Betul District) वऱ्हाडानं भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला असून या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 20 जण जखमी झाले आहेत. सध्या गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा बोंद्री गावातून (Bondri Village) वऱ्हाड परतत असताना हा अपघात झाला. कान्हेगाव ते केशिया दरम्यान हा अपघात झाला असून ही घटना चिचोली पोलीस ठाण्याच्या (Chicholi Police Station) हद्दीत घडलीय.
ट्रॅक्टर-ट्रॉली (Tractor-Trolley Accident) कान्हेगाव येथून बाहेर पडली, तेव्हा ट्रॅक्टरचा वेग अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. चालकाच्या निष्काळजीपणामुळं हा अपघात घडल्याचंही बोललं जातंय. दरम्यान, जखमींना डायल-100 च्या मदतीनं चिचोली सामुदायिक आरोग्य केंद्रात (Chicholi Health Center) पाठवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, बोंद्री गावातील लोक लग्नानंतर वधूला आणण्यासाठी गेल्याचं कळतंय.
रात्री अचानक मोठा आवाज झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. सुरुवातीला त्यांनाही काहीच समजलं नाही, पण नंतर कळलं की काहीतरी अपघात झालाय. ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले असता, ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. ग्रामस्थांनी ट्रॉली बाजूला करुन जखमींना बाहेर काढलं. काही लोकांनी डायल-100 वर कॉलही केला होता. डायल-100 टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास केल्यानंतर 5 जणांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.