''काँग्रेस म्हणजे विचारसरणी गमावलेला भावाबहिणीचा पक्ष''

हल्लाबोल : प्रादेशिक पक्ष तर केवळ सत्तेसाठी जाती व धर्माच्या आधारावर स्थानिक लोकांचे ध्रुवीकरण करण्यापासूनही टाळत नाही.
BJP J P Nadda criticize congerss party dynasty politics rahul gandhi sonia gandhi
BJP J P Nadda criticize congerss party dynasty politics rahul gandhi sonia gandhie sakal

नवी दिल्ली - भाजप वगळता देशातील बहुतांश राजकीय पक्ष एखाद्या कटुंबांची खासगी मालमत्ता झाल्याचा आरोप करतानाच भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी, काँग्रेस कोठे उरली आहे ? तो तर आपली विचारसरणी गमावलेला एका भावाबहिणीचा पक्ष झाला आहे, असे टीकास्त्र सोडले. प्रादेशिक पक्ष तर केवळ सत्तेसाठी जाती व धर्माच्या आधारावर स्थानिक लोकांचे ध्रुवीकरण करण्यापासूनही टाळत नाही असाही हल्लाबोल त्यांनी केला.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे नेहरू ग्रंथालयाच्या सभागृहात झालेल्या ‘घराणेशाहीचा लोकशाहीला धोका‘ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन करताना नड्डा यांनी देशातील अनेक पक्ष घराणेशाहीच्या रोगाने ग्रस्त असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातही घराणेशाहीचा धोका गंभीर बनल्याचे सांगून भाजप हाच लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आशेचा किरण उरल्याचे प्रतिपादन केले. केंद्रीय मंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते आरसीपी सिंह, अण्णाद्रमुक नेते थबी दुराई, ज्येष्ठ भाजप खासदार विनय सहस्त्रबुध्दे, म्हाळगी प्रबोधिनीचे प्रमुख रवींद्र साठे आदी उपस्थित होते.

नड्डा यांनी काँग्रेसवरच टीकेचा रोख ठेवला. मात्र दिल्ली व पंजाबमधील सत्तारूढ आम आदमी पक्ष, घराणेशाहीचा मागमूस नसलेल्या डाव्या पक्षांचा व भाजपमधील घराणेशाही चा उल्लेख त्यांनी टाळला. कॉंग्रेसची परिस्थिती तर घराणेशाहीबाबत गंभीरच असल्याचे सांगून नड्डा म्हणाले की या पक्षाने आपली विचारसरणी कधीच गमावली. आता हा पक्ष ना धड राष्ट्रीय, ना भारतीय, ना लोकशाहीवादी पक्ष उरला आहे. तो केवळ भावाबहिणीचा पक्ष झाला आहे. १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादणारी कॉंग्रेस आपल्या विचारसरणीपासून पार भरकटली. प्रादेशिक पक्षांत तृणमूल कॉंग्रेस, शिवसेना, सपा, लोकदल, पीडीपी, राजद, नॅशनल कॉन्फरन्स, अकाली दल, बीजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती आदी सारेच पक्ष एखाद्या घराण्याचे पक्ष उरले आहेत. तृणमूल कॉंग्रेसवर आत्या-भाच्याचे तर झारखंड मुक्ती मोर्चासारखे पक्ष बाप-लेकांचे पक्ष झाले आहेत. केवळ सत्ता हस्तगत करणे हाच यांचा उद्देश असतो. यांना कोणत्याही विचारसरणीशी देणेघेणे नसते. त्या पक्षांना केवळ स्वतःच्या घराण्याचे भले करायचे असते त्यासाठी ते कोणत्याही थराला जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com