Wayanad : वायनाडच्या खासदारकीवरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली! रॉबर्ट वद्रा यांनाही उमेदवारी देण्याचा दिला खोचक सल्ला

काँग्रेसने वायनाडमधील लोकांचा फसवणूक केली आहे, अशी टीका केरळमधील भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
BJP leaders in Kerala criticizing that Congress has cheated the people of Wayanad lok Sabha Election  Priyanka Gandhi rak94
BJP leaders in Kerala criticizing that Congress has cheated the people of Wayanad lok Sabha Election Priyanka Gandhi rak94
Updated on

तिरुअनंतपुरम : काँग्रेसने वायनाडमधील लोकांचा फसवणूक केली आहे, अशी टीका केरळमधील भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघाची खासदारकी स्वतःकडे ठेवायचा निर्णय घेत केरळमधील वायनाड येथील खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून, तेथील पोट निवडणुकीमध्ये प्रियांका गांधी-वद्रा यांना काँग्रेसच्या वतीने उमेदवारी देण्यात आल्याने भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने आता पलक्कड येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये रॉबर्ट वद्रा यांनाही काँग्रेसने उमेदवारी द्यावी असा खोचक सल्ला भाजप नेत्यांनी दिला आहे.

भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले, ‘‘गांधी-नेहरू घराण्याचे हित जोपासण्यासाठी, काँग्रेस पक्ष हा केवळ एक साधन आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’’ आज वायनाडची खासदारकी सोडणारे राहुल गांधी हे निवडणूक प्रचारामध्ये वायनाड हे माझे घर आहे, असा प्रचार करत होते, आता मात्र त्यांनी या कुटुंबाबद्दल त्यांना काय वाटते हे चांगले दाखवून दिले आहे, असे सुरेंद्रन म्हणाले. तर, ‘‘वायनाडमधील नागरिकांनी राहुल गांधींच्या या कृतीबद्दल काँग्रेसला मतदान यंत्रातून चांगली अद्दल घडवावी असे आवाहन, भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. मुरलीधरन यांनी ‘एक्सच्या’ माध्यमातून केले आहे.

BJP leaders in Kerala criticizing that Congress has cheated the people of Wayanad lok Sabha Election  Priyanka Gandhi rak94
Priyanka Gandhi Wayanad: आता वायनाडला प्रियंका गांधींचा 'हात'; पहिल्यांदाच उतरल्या निवडणुकीच्या मैदानात

काँग्रेसकडून प्रत्युत्तर

काँग्रेसचे नेते व्ही.डी. सतीशन यांनी मात्र भाजपकडून होणारी टीका अनाठायी असून केवळ वायनाडच नव्हे तर सर्व केरळ राज्य प्रियांका यांचे स्वागत करेल, असा दावा केला आहे. ‘‘केरळमधील सत्ताधारी ‘युडीएफ’आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी या निर्णयाचे आनंदाने स्वागत केले आहे. उत्तर भारतातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी वायनाड आणि रायबरेली यापैकी रायबरेलीची निवड केली आहे,’’ असे सतीशन म्हणाले. इतकेच नव्हे तर राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका या अधिक मताधिक्याने निवडून येथील असा दावाही सतीशन यांनी केला.

BJP leaders in Kerala criticizing that Congress has cheated the people of Wayanad lok Sabha Election  Priyanka Gandhi rak94
Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com