Mumbai Victory Sparks Celebrations in Assam
esakal
देश
Mumbai Mahapalika: मुंबईतील भाजपच्या विजयामुळे 'आसाम'ची सभा गाजली, नरेंद्र मोदींचे मोठे विधान!
BJP’s Mumbai Victory, Assam Rally & PM Modi’s Message to the Nation : मुंबईतील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर आसाममधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला, विकास, ईशान्य भारत आणि काझीरंगा संरक्षणावर ठळक भाष्य
आसामच्या कालियाबोर भागात आयोजित एका मोठ्या जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर तीव्र हल्ला चढवला. त्यांनी सांगितले की, सध्या भाजप हा देशातील जनतेचा सर्वोच्च विश्वासू पक्ष बनला आहे. मागील दीड वर्षांपासून देशातील लोकांचा भाजपवरील विश्वास सतत वाढत चालला आहे. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकांमध्ये, २० वर्षांनंतरही तेथील मतदारांनी भाजपला अभूतपूर्व मते आणि जागा बहाल केल्या.

