कोलकता : भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत दोघांनाही तत्काळ अटक करण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरद्वारे केली. अशा प्रकारच्या वक्तव्यातून केवळ हिंसाचारच घडत नाही तर सामाजिक विभाजनही होते, असे सांगत सर्व जातीधर्माच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. बॅनर्जी यांनी यासंदर्भात अनेक ट्विट केले.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की भाजपच्या काही नेत्यांनी नुकतेच केलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्याचा मी निषेध करते. अशा वक्तव्यातून केवळ हिंसाचारच पसरत नाही तर देशाचे एकतेचे विभाजन होऊन शांतता आणि सौहार्दाचे वातावरणही बिघडते. त्यामुळे, प्रेषित पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल या भाजपच्या माजी नेत्यांना अटक करण्यात यावी. त्यामुळे, देशाचे ऐक्य भंग पावणार नाही. तसेच लोकांना मानसिक त्रासही सहन करावा लागणार नाही, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन सर्व जातीधर्माच्या लोकांनी चिथावणी दिल्यानंतरही शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले. शर्मा आणि जिंदाल यांच्या वक्तव्याचे इस्लामिक देशांत तीव्र पडसाद उमटले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.