भाजप राज्याराज्यांत रणनीती बदलणार

BJP
BJP

नवी दिल्ली - भाजपच्या सध्याच्या रणनीतीला झारखंडपाठोपाठ दिल्लीतही सपाटून मार बसल्यावर आता राज्यांच्या निवडणुकांना सामोरे जाताना रणनीतीमध्ये लक्षणीय बदल करण्याचा विचारप्रवाह सत्तारूढ भाजपत बळावला आहे. राज्यांतील विषयांना प्राधान्य देणे, समान विचारसरणीच्या पक्षांबरोबर युती करणे व मित्रपक्षांना सन्मानाने वागविणे, या मुद्द्यांवर पक्षनेतृत्व गंभीरपणे विचार करत आहे. 

दीड वर्षात भाजपने सहा मोठी राज्ये गमावली आहेत. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यावर झारखंडमध्ये झारखंड विकास मोर्चाचे नेते बाबूलाल मरांडी यांच्याबरोबरची युती भाजपने वेळ गेल्यावर आकाराला आणली. मात्र, ही युती होताना मरांडी यांना ज्या सन्मानाने वागविल्याची दृश्‍ये झळकली; त्यावरून केंद्रातील भाजप नेतृत्वाला बिहार, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू व केरळमध्ये मित्रपक्षांना व त्यांच्या नेत्यांना योग्य मान दिला पाहिजे, ही वस्तुस्थिती लक्षात आल्याचे मानले जात आहे.

दिल्लीत भाजपची बड्या नेत्यांची फौज उरतवूनही केवळ दिल्लीपुरत्या मर्यादित असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपच्या फौजेचे पानिपत केले. त्यानंतर आता भाजपने राज्याराज्यांतील रणनीतीमध्ये बदल करण्याच्या हालचालींना वेग दिल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. देशातील मतदार लोकसभा व विधानसभेसाठी मतदान करताना वेगवेगळा विचार मोठ्या प्रमाणावर करू लागल्याचे फीडबॅक भाजपकडे आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com