बिहारमध्ये होणार जातीनिहाय जनगणना; राज्य सरकारला भाजपचा पाठिंबा

देशव्यापी जातीनिहाय जनगणना करता येणार नाही असं केंद्राने म्हटलं होतं, त्यामुळे राज्याने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.
nitish kumar
nitish kumargoogle

पटना : बिहारमध्ये भाजपाने जातनिहाय जनगणना करण्यासाठी नितीश कुमार सरकारला पाठिंबा दिला आहे. केंद्राच्या भाजप नेत्यांना डावलून बिहारमधील भाजपाच्या युनिटने बिहार सरकारला पाठिंबा दिला आहे. जातनिहाय जनगणनेसाठी बिहारमधील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.

(Caste Census In Bihar)

सर्वपक्षीय बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, केंद्र सरकाने देशव्यापी जातीनिहाय जनगणनेसाठी परवानगी दिली नाही म्हणून राज्याने जाती निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. राज्यातील नऊ राजकीय पक्षांनी जात जनगणनेचा निर्णय घेतला आहे. यासाठी कबिनेटमध्ये लवकरच परवानगी मिळेल आणि त्यासाठी निधीची तरतूद केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

nitish kumar
दिलासादायक : मान्सून पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रात होणार दाखल

"मागच्या वर्षी भाजपासहित सर्व पक्षांने पंतप्रधान मोदींची जात जनगणनेसाठी भेट घेतली होती. पण केंद्राने जातनिहाय देशव्यापी जनगणना करणे शक्य नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे राज्याने वैयक्तिकरित्या जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे." असं नितीश कुमार यांनी सांगितलं.

राज्य पातळीवर पार पडलेल्या या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जैस्वाल आणि उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद हे उपस्थित होते. विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव. राज्यसभा खासदार मनोज कुमार झा, AIMIM बिहारचे प्रमुख अख्तरुल इमानही या बैठकीला उपस्थित होते.

nitish kumar
केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचं रक्षण करू शकत नाही : संजय राऊत

दरम्यान काही महिन्यांपूर्वी, बिहारमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जात जनगणना होऊ शकत नाही असं सांगितलं होत. तसेच केंद्राने 2011 ची जात जनगणना चुकीची असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे अशी जनगणना करणे अव्यवहार्य असल्याचं ते म्हटले होते.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान यांनी म्हटलंय की, "केवळ जात जनगणना सामाजिक न्याय सुनिश्चित करू शकत नाही म्हणून 'सबका साथ, सबका विकास' हे ध्येय साध्य करण्यासाठी पक्षाने अनेक पावले उचलली आहेत. ते म्हणाले की, भाजपने ओबीसींवर राष्ट्रीय पॅनेलची स्थापना केली आहे आणि मोदी सरकारमध्ये 27 ओबीसी मंत्र्यांचा समावेश केला आहे." असं म्हणत त्यांनी राज्यातील जात जनगणनेसाठी सरकारला पाठिंबा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com