लग्नाच्या दिवशी अनेक विचित्र प्रकार घडत असतात. कोणी हुंड्यासाठी ऐनवेळी लग्नास नकार देतो तर कोणी मानसन्मान केला नाही म्हणून राग धरतो. यामुळे वधूकडील मंडळीला नाहक त्रास सहन करावा लागतो. असाच एक प्रकार मध्य प्रदेशातील उज्जैनमधून समोर आला आहे. यावेळी वधूकडील मंडळीला नव्हे तर वराकडील मंडळींना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. (Bride is absconding with her boyfriend)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठरलेल्या दिवशी लग्न करण्यासाठी वराकडील मंडळी निघाले. इंदूरच्या एमजी रोड पोलिस स्टेशन हद्दीतील जेलरोडवर उज्जैन येथून मिरवणूक पोहोचली होती. वरात लग्न मंडपाच्या दारात उभी होती. मात्र, लग्न मंडपात वधू नव्हती. लग्नापूर्वीच वधू (Bride) बेपत्ता झाली होती. चित्रपटांमध्ये वधू लग्न मंडपातून पळून गेल्याचे आपण पाहतो. मात्र, इथे ब्यूटी पार्लरला गेलेली वधू परतलीच नाही.
वधू बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी बऱ्याच दिवसांपासून वरापासून लपवून ठेवली होती. वधू (Bride) बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची माहिती मिळाल्यानंतर वराच्या कुटुंबीयांनीही पोलिस स्टेशन गाठले. तिथे हातात खंजीर आणि डोक्यावर पगडी घातलेला वराने आपली वधू बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
वधूसोबत फेरे घेण्यासाठी निघालेला वर रात्री उशिरा पोलिस ठाण्याच्या उंबरठ्या घासत होता. या घटनेत पुढे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वराच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे. त्याचवेळी वधू बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी अन्नपूर्णा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, या सर्व प्रकारात वराला वधूविना परतावे लागले. नववधू तरुणासह पळून गेल्याची माहिती आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.