चीनचा एकही सैनिक भारतीय हद्दीत नसल्याचे स्पष्ट सांगा; राहुल गांधींनी केली मोदी सरकारवर टीका 

rahul gandhi
rahul gandhi

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोर्यातील सीमेनजीक भारत आनि चीनच्या सैन्यादरम्यान असलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य करताना चीनचा एकही सैनिक भारतीय हद्दीत नसल्याचे सरकारने स्पष्ट करावे असे आव्हान केले आहे. 

लडाखजवळच्या सीमेवर भारतीय आणि चीनी सैनिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असून दोन्ही देशांदरम्यान महिनाभराहून अधिक काळापासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लडाखमध्ये गलवान खोरे आणि पँगॉंगत्सो भागात चीन सैन्याच्या घुसखोरीनंतर भारतानेही आक्रमकपणे प्रत्युत्तराची तयारी केली आहे. या प्रकरणात राहुल गांधींनी केंद्र सरकार पारदर्शक नसल्याचा आरोप केला होता. तसेच चीन आणि नेपाळबद्दल सरकारने वस्तुस्थिती देशासमोर सादर करावी, असे आवाहन केले होते. आज मात्र त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून राहुल गांधींनी ट्विट करून सरकारला विचारले, की चीनचा एकही सैनिक भारतीय हद्दीत नाही याची सरकारने हमी द्यावी. तत्पूर्वी, कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या संपूर्ण प्रकरणात सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, या तणावावर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मतप्रदर्शन करताना म्हटले होते की कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारताने योग्य ती पावले उचलली आहेत. मात्र, सीमा प्रश्नावर शांततेने तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठकही शनिवारी (ता.६) अपेक्षित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com