

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘जनगणने’मधील ‘जातगणने’च्या प्रक्रियेला काँग्रेसने कडाडून विरोध दर्शविला आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सध्याची प्रश्नावली रद्द करण्याची मागणी केली आहे.