

‘‘डबल इंजिन असलेले सरकारच बदल घडवून आणू शकते,’’ असे सांगत आम आदमी पक्षाचे(आप) दिल्ली मॉडेल पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी येथे केली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी नायडू यांनी दिल्लीत प्रचार केला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.