

CJI Surya Kant
Esakal
नवी दिल्ली : सोशल मीडियावरील प्रसिद्धी किंवा ऑनलाइन लोकप्रियता ही यशाची खरी मोजमाप नाही, असा महत्त्वपूर्ण संदेश भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी दिला. कायदेशीर क्षेत्रात दीर्घकाळ टिकणारा सन्मान आणि विश्वास हा डिजिटल माध्यमांमुळे नव्हे, तर सातत्यपूर्ण मेहनत, गुणवत्तापूर्ण काम आणि न्यायालयात निर्माण झालेल्या विश्वासार्हतेमुळे मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.