chorla ghat accident near goa border
esakal
खानापूर : गोव्याच्या सीमावर्ती भागातील चोर्ला घाटात मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात (Chorla Ghat Accident) दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. बेळगाव येथे लग्नाच्या खरेदीसाठी गेलेले चौघे जण परतत असताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटून वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात घडला.