
भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून लोकसभचे सर्वाधिक खासदार जातात. मात्र या दोन्ही राज्याच भाजपला यश आलं नाही. उत्तर प्रदेशात ८० जागांपैकी फक्त ३३ जागा भाजपला जिंकता आल्या. तर महाराष्ट्रात भाजपला फक्त ९ जागा मिळाल्या. २०१४ अणि २०१९ सा चांगली कामगिरी केली होती. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने सर्वाधिक ३७ जागा जिंकल्या. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना आता नारळ मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर मोठा दावा समोर आला आहे.
ज्येष्ठ पत्रकार श्यामलाल यादव यांनी त्यांच्या "ॲट द हार्ट ऑफ पॉवर: द चीफ मिनिस्टर्स ऑफ उत्तर प्रदेश" या पुस्तकात दावा केला आहे की, २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हटवण्याची पूर्ण तयारी झाली होती.
मात्र नंतर पक्षांतर्गत सर्व्हे करण्यात आला. जर योगींना हटवले तर भाजपला उत्तर प्रदेशात नुकासन होईल, असा अंदाज समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना हटवले नाही.
श्यामलाल यादव यांनी पुस्तकात कोणतेही कारण दिले नाही. मात्र त्यांनी उत्तर प्रदेशचे तत्कालीन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याशी योंगीचे मतभेद वाढत चालल्याचे नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.